Saturday, November 26, 2011

मला मरण हवे आहे ....... पण यमराज गेले होते सुट्टीवर.......!

नमस्कार मित्रहो  आज भरपूर दिवसाने वेळ मिळाला एक भविष कथन तुमच्या बरोबर शेअर करायला.....! दिनांक १५/१०/२०११ ला संद्याकाळी १९:२० वाजता फोन आला.
मी: हलो .... नमस्कार
समोरून आवाज आला ...... नमस्कार मी महेश  बोलोतो आहे . मला अमुक एका व्यातीने तुमचा फोन दिला आहे.  माल इमर्जन्सी आहे,
मी: बोला काय काम आहे.
महेश : माझा लहान भाऊ दिनांक १२/१०/२०११ पासून घरी आला नाही. मला तुमची मदत हवी आहे, त्याची पत्रिका पाहून मला सांगाल का? कि तो कुठे आहे आणि जिवंत आहे का?
मी: जरा बुचकळ्यातच पडलो........
ठीक आहे महेश साहिब तुम्ही त्याची जन्म वेळ आणि तारीख, स्थळ द्या मला मी प्रथम त्याची पत्रिका पाहतो.
 महेश: नाव:  abk   २३/०७/१९८१ वेळ:  १०:३० सकाळी. मुंबई.
पण असे ज्वलंत प्रश्न हे नेहमी प्रश्न कुंडली वरूनच सोडवावे असा नियम आहे, त्यामुळे मी त्यांना लगेच सांगितली किं आपण प्रश्न कुंडली पण मांडूया. सगळ सविस्तर मी त्या व्यक्तीची माहिती त्याच्या भावा  कडून ऐकली, असे काय झाले होते कि ती व्यक्ती  घर सोडून गेली.
  मी त्याची पत्रिका पाहीली असता असे निदर्शनास आलेकी ती व्यक्ती मनस्तापात होती. त्याची ग्रह दशा १,३,८,५,९ अशा स्थानाशी निगडीत आहे. अशा वेळी नोकरीत वारीष्टांचा त्रास संभवतो, नोकरीत मन रमत नाही, नोकरी मध्ये बद्दल संभवतो, ती व्यक्ती  नोकरी सोडून देते. म असे  ह्याचे झाले काय कि हि व्यक्ती सकाळी नोकरीला गेली पण घरी आली नाही. १२ तारखेला रात्री ८ च्या सुमारास त्यांनी घरी फोन केला आणि सागिंतले कि मला घरी येण्यासाठी उशीर होईल आणि ती व्यक्ती घरी आलीच नाही..........!
म असे झाले काय?
         महाशयांनी खोटे रुजू पत्र बनवले होते आणि कंपनीला देले होते, मला अमुक एका कंपनी मध्ये एवडा पगार मिळत आहे, तुम्ही माझा पगार वाढवता कि मी सोडून जाऊ, त्याच्या वारीष्टांनि त्याची त्या कंपनी मध्ये विचारपूस केली असता ते फेक निगाले.
 म काय हे त्याला कळले आणि कंपनी मध्ये याची गोची झाली. त्या कारणास्तव महाशय घर सोडून गेले .
असे त्यांच्या बंधूने आम्हाला फोन वरून सांगितले.
वरील सर्व कथा ऐकली...... पण महाशय जिवंत आहेतका?
हा प्रश्न मी प्रश्न कुंडली वरूनच जास्त स्पष्टपने सांगूशकतो, त्या साठी त्याच्या भाव कडून मी १ ते २४९ क्रमांक कोणताही एक क्रमांक सांगा म्हणून सागितलं.
प्रश्न क्रमांक ०२.
वेळ १९:२०
 तारीख :१५/१०/२०११
 प्रश्न : माझा भाऊ हरवला आहे? तो घरी कधी येईल? तो जिवंत आहे का? असे ३ प्रश्नांची उत्तारे  मला त्या कुंडली वरून द्याचे होते.
L: मेष :मंगल
S: कृतिका :रवी
R:मेष :मंगल
D:शनीवर : शनी 
प्रश्न वेळी LSRD वरील प्रामाणि आहे. प्रश्न कुंडलीचा सखोल अभ्यास करता असे लक्षात आलेकी हरवलेली व्यक्ती जिवंत आहे. जिवंत आहे तरी ती आता कुठे आहे ? प्रश्न कुंडलीच्या ग्रहांचा अभ्यास करता असे लक्षात येती कि ती व्यक्ती मुंबई मध्ये नाही. मी पुढचा विचार करत होतो कि  हि व्यक्ती घरी कधी येईल आणि फोन तरी करेल का? खोलवर पत्रिकेचा अभ्यास करता मी त्यांना सांगितले कि तुमच्या भावाचा  फोन किवां तो स्वत: तरी दिनांक २०/११/२०११ रोजी येईल. तुम्ही वाट पहा अथवा तुमच्या परीने प्रयतन चालू ठेव्हा ......!
१९ तारखेला महेश साहेबांचा फोन आला ..... साहेब मी महेश अजून काही भावाचा  पत्ता लागला  नाही आहे .....! मी : तुम्ही जरा धीराने घ्या मी उद्याची तारीख दिली आहे ना म उद्या बोलु  कि ? आणि त्याची समज काढली.
                         सकाळचे माजी पूजा विधी संपली आणि फोन वाजला सुमारे १० वाजता तेजस साहेब महेश बोलतो आहे...... मी मनात बोलतो आहे कि यांना झोप लागली नाही  ...... मी :बोला
 महेश : भावाचा फोन आला होता तो बेंगलोर ला आहे. आणि तो आता बस म्हध्ये  बसत आहे आणि उद्या तो घरी येतो आहे. मी : अरे वा .....!
लगेच त्याचा भाऊ बोलला  साहेब तो जीव देण्यासाठीच गेला होता, तू मी जे मला पत्रिका पाहून सांगितले  तसेच झाले. त्याच्या मनात जीव देण्या विषयाच्या भावना होत्या, तो रेल्वे ट्रक वर जीव देण्यासाठीच बाहेरगावी गेला होता पण कोणी तरी त्याला  तेथे वाचवले आणि समजून घरी जाण्यास सांगितले. मी तुमचा आभारी आहे......! मी बोलो माझे आभार माणू नका आभार माना  माझ्या "स्वामी समर्थाचे " आणि माझ्या के.पी ज्योतिष शास्त्राचे  त्यांनीच तुम्हाला  मार्ग दर्शन दिले आणि तुमच्या भावाला सुद्धा.......! मी एक निमित्त मात्र आहे.
 मी : मनात बोललो ....
"मला मरण हवे आहे ....... पण यमराज गेले होते सुट्टीवर.......!
सूचन :आत्माहत्या करून स्वताल नरकात ढकलू नका कारण त्या मृत्यू नंतर सुधा जीवन असते ......... पिशाच्या योनीचे .........जी थे फक्त वाईट लोकच असतात तुमचे स्वागत करायला.......!