Tuesday, May 31, 2011

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?.

वधू वराची कुंडली पाहून लग्न करणे कितपत योग्य आहे ?. आज मला असा प्रश्न  एका देणा बँकेच्या  म्यानेजर ने विचारला. गोपनीयते साठी मी त्याचे नावं लिहित नाही आहे . मी हसलो आणि बोललो का हो आज मला पाहून तुमाला हा प्रश्न का आठवला. ते पण हसले .... प्रश्न विचारण्यास कारण कि माझाही मुलगा लग्नाचा झाला आहे, समोरून प्रपोझल येत आहेत म्हणून विचारावेसे वाटले. मी बोलण्या आधीच त्या च्या मुखातून नेहमी येणारे वाक्य आमचे लग्न झाले तेव्हा  हे असे फ्याड नोहते. आता मुलगा भले ५०००० हजार कमवता आसो पण पत्रिका जुळली नाही तर मुलगी होय सुधा बोलत नाही. मी मनातल्या मनात बोललो   अरे वां......! समाजात ज्योतिष विषयीची जागृती वाढत जात आहे. मी लगेच साहेब तुमच्या मुलाची पत्रिका आहेका ? 
म्यानेजर  साहेब हो आहे ना .!  मी : मला द्या  मी सांगतो तुमच्या मुलाचे लग्नाचे योग कधी आहेत ते. 
म्यानेजर साहेब हि घ्या तेजस साहेब आणि जरा सांगाहो फार टेन्शन आले आहे .पत्रिका के.पी पद्धतीत नव्हती मला माझा इ- नोटबुक काढावे लागले . मुलाची पत्रिका मी पहिली होती दिनांक १५/ ०९/ २०१० रोजी  ०५ :३७ पं. LSRD काढून जन्म वेळ निच्छित करून घेतली .सगळ्या  कुंडलीची पूर्णतः  अभ्यास करून मी माझी माण वर काढली  तर पाहतो तर काय म्यानेजर साहेब चक्क डुलक्या काढत होते. मी मनात बोलो नक्की हा मानव कन्या राशीचा असणार स्वताचे ओझे दुसर्याच्य माथी मारून स्वत अपुल्या डुलक्या मारतो आहे . मी जोरात आवाज करत साहेब .......! हो ..... मी  अहो पत्रिका पहिली, तुमच्या मुलाचे लग्नाचे योग २०१० मध्ये नाहीत तर ते १६/०५/२०११ च्या नंतर आहेत  ह्या वर्षी विवाह होणे अशक्य . ९ महिने वाट पहावी लागेल सून मिळायला ....! मी मस्करीत बोलो . म्यानेजर साहेब :अहो तेजस साहेब अगोदरच उशीर झाला आहे आणि ९ महिने वाट पहावी लागेल . म्यानेजर साहिबना मी बोलो ते  पटले नाही, अहो एक चांगले  स्थळ आले आहे आणि त्यांना मुलीचा विवाह डिसेंबर परियंत करायचा  आहे फक्त पत्रिका जूळलिका लग्न उरकायचे आहे. मुलाला  मुलगी पसंत आहे. मुली वाल्यांनी सागितले आहे कि ३६ पैकी २८ गुण जुळले आहेत पण तुमची पद्धत निराळी आहे ना त्या मुले मी थाबून ठेवले आहे मुली वाल्यांना,  मुलीची पत्रिका पुढे करत. ठीक आहे मुलीची पत्रिका प्रथम दर्शनी पाहताच मी मनातल्या मनात हसलो. मुलीच्या पत्रिकेतील लग्नाचे योग पाहता असे ध्यानात आले कि मुलीचे लग्न  प्रेम विवाह होणार .दशा महादशा पाहता मुलगी प्रेमात आहे हे दिसते . मी म्यानेजर साहेबांना सांगितले  मुलगी प्रेमात आहे कुणाच्या  तरी ....... चौकशी करावी मुलीची. उगाच आपले सुपुत्र बळी पडतील या लफड्या मध्ये.

आठवड्या भाराने मला म्यानेजर साहेबांचा फोन आला कि तुमी जे भविष्य कथन केलात ते अगदी बरोबर आहे 
मुलीचे  तिच्याच कामावर असलेल्या  मुलाबरोबर प्रेम आहे आणि घरातील लोकांना ते मंजूर नाही आहे .त्या मुळे ते लोक घाही करत होते. मग साहेब तुम्ही विचारलेल्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले  का ? साहेब होय .... तुमचा मी आभारी आहे  Thank u very much ...... !  अ रे हो पण आज मी हा  लेख का लिहितो आहे ते मी सांगायचे  विसरून गेलो त्या मुलाचा साखर पुडा ५ जून 2011 ला आहे . कालच त्यांचा  फोन येऊन गेला आग्रहाचे आमंत्रण आहे. मी सागितले ली लग्नाची तारिक १ ६ /०९/२०११  ते  १७ /११/ २०११ च्या दर्माय्न आहे पाहू पुढे काय होत ते .......................



Monday, May 30, 2011

गुपित वास्तू शास्त्राचे.......!

       गुपित वास्तू शास्त्राचे.......!                                                            
वास्तू शास्त्र हे प्रत्येकाच्या घराघरात पोचले पाहिजे अशी माझे प्रांजळ मत आहे,  पण मला खंत वाटते कि जे वास्तू शास्त्र आज माझ्या देशात घरो घरी  पसरले आहे ते परी पूर्ण नाही. मला येथे  नमूद करावे से वाटते कि वास्तू शास्त्र हे गूढ शास्त्र नाही, हे शास्त्र पूर्णतः वैज्ञानिक शास्त्र आहे. वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत ते नियम पाळावेच लागतात. नियमांच्या बाहेर जाऊन वास्तू सुख उपभोगणे कठीणच आहे हे अढळ सत्य आहे. जसे विज्ञान हे सिद्धांतावर अवलबून असते तसेच वास्तू शास्त्र देखील सिद्धांतावर आधारित आहे. जेसे  पृथ्वीवरील प्रत्येक पाधार्थ हा जर आकाशाकडे उडविला असता पुन्हा तो खाली येतो त्याला  आपण गुरुत्वाकर्षण असे बोलतो तसेच वास्तू शास्त्र मध्ये सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे असते . परंतु जी पुस्तके आज बाजारात विकली जात आहेत त्या मध्ये त्या सिद्धांताचा  उलेख टाळलेला दिसतो किवा त्या पुस्तक लिहिणाऱ्या ला देखील माहिती नसेल कदाचित असे मला वाटते. प्रतेक पुस्तकात प्राथमिक माहिती दिलेली असते आणि मूळ लपून ठेवले जाते .या मागील कारण अजून मला  उमगले नाही. हि  प्राथमिक माहिती वाचून  काही वाचक  आपल्या घरात फेर बदल करायला जातात आणि अपयशास  कारणी भूत ठरतात. बदनाम होते ते वास्तू शास्त्र ......! बाजार मिळणाऱ्या वास्तू शास्त्राची पुस्तके नक्की वाचा पण वास्तू शास्त्र काय आहे ते जाणून घेण्या साठी अंमल करण्या साठी नाही. वास्तू शास्त्र हे ऊर्जेशी निगडीत शास्त्र आहे.  धन आणि ऋण या दोनी उर्जा आपल्या घरला आवश्यक आहेत त्यांचे संतुलन म्हणजेत वास्तू उर्जित करणे होय. हा मूळ सिद्धांत नेहमी लक्षात असुध्या. वरील सिद्धांत जरी एका ओळीचा असाल तरी त्यात पूर्णतः वास्तू शास्त्राचे मूळ गुपित लपले आहे.




Sunday, May 29, 2011

marriage are made in heaven.

 -/\- नमस्कार  आजचा विषय आहे पत्रिका गुण मिलन आणि ग्रह मेलन यातील फरक  .
आज काल विवाह मंडळानी ज्योतिषाची  कामे हाती घेतली आहेत, ते म्हणजे पत्रिका गुणमिलन
वधू- वरच्या कुंडल्या घ्यायच्या आणि त्याची गुण प्रतीवारी काढून त्यांचे  गुण हे १८ पेक्षा  जास्त आहेतना , तर मग विवाह करण्यास काही हरकत नाही....! असे सरास सांगितली जाते. विवाह मंडळ वाल्यांचे काय विवाह जुळला कि ५०० ते १००० रुपये मिळणार असतात . विवाह झाला  म्हणजे झाले. ते जातकाच्या सुखात सहभागी असतात दु:खत नसतात, दु:खत आठवतो तो ज्योतिषी कारण विवाह वधूवराचे  आयुष्य बदलून टाकते, दोन अनोळखी जीव एकत्र येऊन संसार चालवणार असतात गुण मिलन हे दोन राशीचे मिलन असते तुमच्या कुंडलीतील ग्रहानचे नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे .
  आजच्या शैषणिक युगात चार पुस्तके वाचलेले मुले  मूलतः ज्योतिष हा विषयच मानत नाहीत. मुलगा अथवा मुलगी सुस्वरूप आहे, स्वताचे घर आहे, चांगली नोकरी आहे मग  झाले. पत्रिका पहिली ना गुण १८ च्या वर आहेत ना मग  झालेतर "रिश्ता पक्का समझो" 
वाचक हो जरा थांबा पुढील दिलेले ज्योतिष शास्त्राचे विचार जरा वाचा आणि मग पाउल  पुढे उचला. 

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे सत्य असले तरी ज्योतिष शास्त्र न माणारी माणसे पत्रिका पहिल्या शिवाय विवाह जुळवत नाही हे सत्य नाकारता येत नाही .....
शास्त्र करांनी गुणमिलन काढले खरे पण त्याचा वापर करणार्यांनी त्याचा अभ्यास कुठे केला आहे . अर्धवट राव  कार्यकरतात बदनाम होते माझे ज्योतिष शास्त्र. मग  कानावर नेहमी पडणारी वाक्य ..... "माझे तर ३६ पैकी  ३० गुण जमले होते पण काय माझे भाग्यच खोटे, माझे  आणि माझ्या पतीचे जमतच नाही, नेहमी  घरी आले कि भांडणच होते, कोणी मेल्याने पत्रिका जमवली कोण जाने आणि मी हो बोलले ......!" अशी अनेक वाक्य माझा कडे आहेत जी मी माझ्या जातका कडून ऐकतो ...... त्या  वेळेला त्यांची  कीव येते .
मग  मी माझी ज्योतिष  विषया बद्दलची  माहिती त्याच्या  पुढे सादर करतो त्यावेळी त्याच्या डोक्यात उजेड पडतो..... बोलतात आधी भेटला असता तर आज माझी हि अवस्ता  नसती .......!
तर पाहू माझे ज्योतिष  ज्ञान काय सांगते ते ..
प्रथम ज्योतिष शास्त्र  मानत असाल तरच ज्योतिषा कडे जावे , ज्योतिषी गुणमिलन करतो त्यावेळी ग्रह मिलन करतो काते  पाहावे, ग्रह मिलनात खालील मुद्याचा आढावा घ्यावा लागतो
 वैवाहिक सौख्य , संतती सौख्य, कामजीवन, आरोग्य, जीवन मरीयादा, नोकरी / व्यवसाय, आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्ठीचा आभ्यास करून ज्योतिषानी  निर्णय द्यावा.पत्रिकेतील चांगल्या वाईट गोष्टीचा आढावा येणाऱ्या त्या जातकाल द्यावा. जेणेकरून सुस्वरूप असलेले स्थळ जातकास लाभदायक आहेका ? त्याचे ज्ञान जातकास द्यावे व निर्णय घेण्यास त्यांनाच सांगावे. कारण ज्योतिषी हा मार्ग दर्शक आहे तो तुमचे भविष्य बदलू शकत नाही. जिन्या वरून पडणार हे जर ज्योतिषाने सांगितले तर तुम्ही पडणार हे निच्छित पण सावध गिरी बाळगली तर मार नक्की कमी लागेल होणा ............. विषय आवडला तर नक्की पर्तिसाद द्या ......!

tejastrology@gmial.com  Mob : 9320196969
                                              // श्री स्वामी समर्थ कृपा //